प्रथम सत्र - इ. 7 वी विज्ञान महत्वाची प्रश्नोत्तर (मराठी माध्यम)

 

प्रथम सत्र 

इ - 7 वी

विषय- सा. विज्ञान

गुण- 50

प्र.1 ला ) रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा.  (कोणतेही 10)                    - 10

(पाश्चरीकरण, तापमान, त्वरण, तांबे, प्रारण, पांढरा, सदैव प्रतिकर्षण, वहन, शून्य, काळा, नैसर्गिक परिरक्षकसुवाहक, चालआर्द्रता, प्रभारीत वस्तू, रासायनिक परिरक्षक, ऋण प्रभारचे विस्थापन, वेग, निर्जलीकरण  )

1.    मीठ हे नैसर्गिक परिरक्षक आहे.

2.    हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या आर्द्रता प्रमाणे ठरते

3.    सर्वाधिक उष्णता काळ्या रंगाच्या वस्तूकडून शोषली जाते.

4.    चाल ही राशी अदिश राशी आहे.

5.    सजातीय विद्युत प्रभारांमध्ये सदैव प्रतिकर्षण होते.

6.    दूध तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात. अन्नपदार्थांच्या परिरक्षणाच्या या पद्धतीला पाश्चरीकरण असे म्हणतात.

7.    सूर्यापासून पृथ्वीला प्रारण मुळे उष्णता मिळते.

8.    तडितरक्षक तांब्याच्या पट्टीपासून बनवला जातो.

9.    अन्न शिजवण्याची भांडी सुवाहक गुणधर्मामुळे धातूची बनवलेली असतात.

10.   जर वस्तू एकसमान वेगाने जात असेल तर तिचे त्वरण शून्य असते.

          11.    व्हिनेगर हे रासायनिक परिरक्षक आहे.

    12 .       एखाद्या वस्तूमध्ये विद्युतप्रभार निर्माण होण्यासाठी ऋण प्रभारचे                         विस्थापन कारणीभूत असते.

      13. विद्युतदर्शीने प्रभारीत वस्तू ओळखता येते.

      14.  शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला निर्जलीकरण असे                 म्हणतात.

 

 ) सांगा लावू मी कोणाशी जोडी? (कोणतेही 5)                   - 5

गट                          गट

1. वस्तुमान                               . किलोग्रॅम / घनमीटर

2. घनता                                    . आकार्यता

3. कीटकभक्षी वनस्पती              . चौरस मीटर

4. माती                                      . ड्रॉसेरा

5. वेग                                        . लीटर

6. क्षेत्रफळ                                 . किलोग्रॅम

7. आकारमान                            . मीटर/सेकंद

उत्तरे:

1. वस्तुमान  -                 ई. किलोग्रॅम                       

2. घनता  -                     अ. किलोग्रॅम / घनमीटर

3. कीटकभक्षी वनस्पती -  ड. ड्रॉसेरा

4. माती  -                      ब. आकार्यता

5. वेग -                         उ. मीटर/सेकंद

6. क्षेत्रफळ -                   क. चौरस मीटर

7. आकारमान -              इ. लीटर                  

) आमच्यातील वेगळे कोण आहे? (कोणतेही 5)                 - 5

1.    केळी, सफरचंद, पेरू, बदाम.  : बदाम 

2.    पिके वाहून जाणे, पिकांवर कीड, ज्वालामुखी, पीक करपणे.  : ज्वालामुखी 

3.    साठवणे, गोठवणे, निवळणे, सुकवणे.  : निवळणे 

4.    दुष्काळ, भूकंप, ढगफुटी, रेल्वे अपघात.  : रेल्वे अपघात 

5.    अवर्षण, अतिवृष्टी, वादळे, त्सुनामी.  : अवर्षण 

6.    शिलारस, उष्ण चिखल, राख, टोळधाड.  : टोळधाड 

7.    मीठ, व्हिनेगर, सायट्रिक आम्ल, सोडिअम बेन्झोएट.  : मीठ 

8.    लाखीची डाळ, विटांची भुकटी, मेटॅनिल यलो, हळद पावडर.  : हळद पावडर 

) सत्य की असत्य ते सांगा. (कोणतेही 5)                         - 5

1.    रेताड मृदेची जलधारण क्षमता कमी असते.  : सत्य 

2.    अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडतोसत्य 

3.    आकाशात वीज कडाडत असताना पोहू नये. सत्य

4.    ज्वालामुखीचा उद्रेक टाळता येणे शक्य आहे. सत्य

5.    ज्या पदार्थात द्राव्य विरघळते त्याला द्रावक म्हणतात. सत्य

6.    वादळ येणार आहे ही माहिती गुप्त ठेवायची असते. सत्य

प्र. 2 रा ) कोण उष्णता शोषून घेईल? (कोणतेही 3)                      - 3

वस्तू/ पदार्थ

होयनाही

वस्तू/ पदार्थ

होयनाही

1.    स्टीलचा चमचा

 होय 

2.    लाकडी पोळपाट

 नाही 

3.    काच

 होय

4.    तवा

   होय  

5.    प्लॅस्टिकची प्लेट

नाही  

 

 

 

) खालील तक्ता पूर्ण करा. (कोणतेही 3)                  - 3


     

क्र.

पदार्थ

भेसळ

 1.

हळद 

मेटॅनिल यलो

2.

मिरी

पपईच्या बिया 

3.

रवा

   लोहकीस

4.               

मध

गुळाचा पाक

5.

दूध

पाणी आणि युरिया 

6.

आईस्क्रीम

धुण्याचा सोडा, कागदाचा लगदा  

7.

मिरची पावडर

विटाची भुकटी

) खालील तक्ता पूर्ण करा. (कोणतेही 3)                 - 3

राशी

 एककाचे नाव

एकक चिन्ह

1.    लांबी       

  मीटर       

 m

2.    वस्तुमान

किलोग्रॅम

 kg

3.    काळ       

सेकंद        

 s

 

) उदाहरणांसहित स्पष्ट करा. (कोणतेही 1)                        - 2

. भूकंप : भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्यामुळे भूकंप लहरी तयार होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. परिणामी जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा, कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे या सारख्या घटना घडतात. यालाच भूकंप असे म्हणतात. उदा. 30 सप्टें.1993 साली लातूर येथे झालेला भूकंप.

. सदिश राशी : सदिश राशी या परिमाण व दिशा यांच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येतात. विस्थापन, वे या सदिश राशी आहेत.

उदाहरणार्थ, (1) (i) उत्तर दिशेस 20 किलोमीटर विस्थापन व (ii) पूर्व दिशेस 20 किलोमीटर विस्थापन यां फरक आहे. येथे अंतर समान आहे पण भाग (ii) मध्ये विस्थापानाची दिशा वेगळी आहे.

(2) (i) आकाशात दक्षिणेकडे 500 किमी प्रतितास वेगाने चाललेले विमान व आकाशात पूर्वेकडे 500 किमी प्रतितास वेगाने चाललेले विमान यात फरक आहे. येथे चाल समान आहे परंतु भाग (ii) मध्ये गतीची दिशा वेगळी आहे.

. अदिश राशी : अदिश राशी केवळ परिमाणाच्या साहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येते. उदाहरणार्थ, लांबी, वस्तुमान क्षेत्रफळ, तापमान, घनता, कालावधी, कार्य इत्यादीचा राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिमाणाचा म्हणजेच मूल् व एककाचा वापर होतो. यात दिशेचा अंतर्भाव नसतो.

प्र. 3 रा )  खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (कोणतेही 4)                    - 8

1.    एकाच पेशीत सर्वजीवनक्रिया होणारे एकपेशीय सजीव कोणते?

उत्तर : पोषणासंबंधीच्या सर्व क्रिया एकाच पेशीत होणारे प्राणी म्हणजे अमीबा, युग्लीना आणि पॅरामेशिअम. हे सारे एकपेशीय सजीव आहेत.

2.    उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार लिहा.

उत्तर : वहन, अभिसरण आणि प्रारण हे उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार आहेत.

3.    प्रभार कसे निर्माण होतात?

उत्तर : दोन वस्तू एकमेकांवर घासल्या असता, एक वस्तूवरील ऋणप्रभार दुसऱ्या वस्तूवर गेल्याने ती दुसरी वस्तू ऋणप्रभारित होते, तर पहिली वस्तू धनप्रभारित होते.  

4.    दुधाचे पाश्चरीकरण कसे करतात?

उत्तर : पाश्चरीकरण पद्धतीने दूध 80 °C तापमानापर्यंत 15 मिनिटे तापवले जाते व नंतर ताबडतोब ते थंड केले जाते. यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन दूध दीर्घकाळ टिकते.

5.    अन्नबिघाड करणारे विविध घटक कोणते?

उत्तर :  (1) अन्नाचा बिघाड अतिशय सहजरीत्या होतो. शेतापासून ते ग्राहकापर्यंत अन्न वाहतूक करतानाच अन्नपदार्थांना इजा पोहोचू शकते. (2) अयोग्य हाताळणी, अयोग्य साठवण, अयोग्य वाहतूक इत्यादींमुळे अन्न खराब होते. काही नाशिवंत अन्नपदार्थ लवकर खराब होतात. (3) दूध, मांस इत्यादी आम्ल किंवा आम्लारियुक्त असतात. त्यांच्यात अंतःस्थ बदल होत असतात. (4) रासायनिक प्रक्रिया होऊन अन्नपदार्थ बिघडतात. काही अन्नपदार्थांचा धातूशी संपर्क झाल्यास अशा प्रक्रिया होतात. (5) हवा, पाणी, जमीन यांमधील सूक्ष्मजीव किंवा परिसरातले कीटक अन्नामध्ये प्रवेश करतात; त्यामुळे अन्नबिघाड होतो.

6.    राजस्थानमध्ये घरांना पांढरा रंग का देतात?

उत्तर : राजस्थानमध्ये वातावरणाचे तापमान खूप जास्त असते. पांढऱ्या रंगामुळे अपाती उष्णता प्रारणाचे मोठ्या प्रमाणावर परावर्तन होऊन उष्णतेचे शोषण कमी प्रमाणात होते. म्हणून राजस्थानमध्ये घरांना पांढरा रंग का देतात

) शास्त्रीय कारणे लिहा. (कोणतेही 3)                    - 6

1.    हिवाळ्यात गवतावर दबबिंदू जमा होतात.

उत्तर : हवेत पाण्याची वाफ असते. हवेची बाष्प धारण करण्याची क्षमता तापमानावर अवलंबून असते. हिवाळ्यात तापमान कमी झाल्यावर ही क्षमता कमी होते व तापमान फार कमी झाल्यास ज्यादा पाण्याचे थेंब(दवबिंदू) गवतावर संघनन होऊन त्याचे दवबिंदू तयार होतात.

2.    हिवाळ्यात रात्री आपल्या हाताला लोखंडाचा खांब लाकडी दांड्यापेक्षा थंड लागतो.

उत्तर : लोखंड उष्णतेचे सुवाहक आहे, तर लाकूड उष्णतेचे दुर्वाहक आहे. हिवाळ्यात रात्री वातावरणाचे तापमान आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा बरेच कमी असते. अशा वेळी लोखंडाच्या खांबाला आपण हात लावल्यास उष्णतेचे वहन सहजपणे आपल्या हाताकडून लोखंडाच्या खांबाकडे होते. त्यामुळे आपल्या हाताला तो खांब थंड लागतो. मात्र लाकडी दांड्याला हात लावल्यास त्या प्रमाणात उष्णतेचे वहन न झाल्याने तो लोखंडी खांबासारखा थंड लागत नाही.

3.    शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही.

         उत्तर : प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या भागांची मापे निरनिराळी असतात. त्यांत काहीही प्रमाणीकरण नसते. त्यामुळे शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही.

4.    5 सेल्सिअस तापमानाला अन्नपदार्थ सुरक्षित राहतात.

उत्तर :  थंड तापमानात जैविक प्रक्रिया होत नाहीत. जीवाणू, बुरशी असे उपद्रवी सूक्ष्मजीव अन्नावर परिणाम करू शकत नाहीत. म्हणून अन्नपदार्थ 5° सेल्सिअस तापमानाला सुरक्षित राहतात.

5.    सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात

उत्तर : बुफे पद्धतीत आपल्याला हवे तितकेच जेवण-खाणे घ्यायचे असते. अन्नाचा अपव्यय होऊ नये म्हणून ही पद्धत सुरू करण्यात आली असावी. पारंपरिक पंगतीच्या भोजनात आग्रह करून अन्नाची नासाडी केली जाते. म्हणून सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात.

6.    फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते.

उत्तर : कीटकामध्ये खास कार्य करणारे मुखावयव असतात. फुलपाखरू फुलातला रस शोषते, त्यासाठी त्याला नळीसारखी सोंड असते. याचा वापर करून ते अन्नग्रहण करते.

 

Maharashtra State Board Exercises ( Semi/Marathi)

5 वी परिसर अभ्यास - 1 5th EVS (Semi) 6th General Science (Semi) 7th General Science (Semi) 6वी सामान्य विज्ञान (मराठी माध्यम) 7 वी सामान्य व...