प्रथम सत्र
5 वी परिसर अभ्यास – 1
गुण - 40
प्र. 1. अ . चूक की बरोबर ते सांगा : (कोणतेही 7) -
7
(1) पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर मिळते. - चूक
(2) फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला ऊब मिळते. - चूक
(3) सुधारित बियाण्यांच्या वापरामुळे उत्पादन वाढत नाही. - चूक
(4) आपला भारत देश शेतीप्रधान आहे. - बरोबर
(5) पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो. - बरोबर
(6) उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येत नाहीत. - चूक
(7) शेती करण्याची फक्त एकच पद्धत आहे. - चूक
(8) जैवविविधता जपणे आवश्यक आहे. - बरोबर
(9) नाकतोडा पक्ष्याला खातो. - चूक
ब. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा : (कोणतेही 3) - 3
(1) पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास परिवलन म्हणतात.
(2) पृथ्वीच्या परिवलनामुळे दिन व रात्र होतात.
(3) पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या
फिरण्यास परिभ्रमण म्हणतात.
क. मी कोण ? (कोणतेही 5) -
5
(1) मी स्वतःभोवतीही फिरतो आणि ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालतो.
(2) मी स्वयंप्रकाशी आहे. माझ्यापासून निघणाऱ्या
प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो.
(3) पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता. तुम्हांला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो. - चंद्र
(4) मी स्वतःभोवती, ग्रहाभोवती आणि ताऱ्याभोवतीही फिरतो.
(5) मी पृथ्वीपासून सर्वांत जवळचा तारा आहे.
(6) माझ्यासारखी सजीवसृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही.
प्र.2. अ. जोड्या जुळवा : - 3
'अ' गट
उत्तरे 'ब' गट
(1) कोरड्या हवेतील धान्यसाठा (क ) (अ) बुरशी लागणे
(2) दमट हवेतील धान्यसाठा ( अ ) (ब) कीड-मुंगी न लागणे
(3) धान्य साठयात औषधे ठेवणे (ब ) (क) धान्याला बुरशी न लागणे
उत्तरे :
(1) कोरड्या हवेतील धान्यसाठा - (क) धान्याला बुरशी न लागणे
(2) दमट हवेतील धान्यसाठा - (अ) बुरशी लागणे
(3) धान्य साठयात औषधे ठेवणे - (ब) कीड-मुंगी न लागणे
ब. प्रत्येकी दोन उदाहरणे लिहा. - 4
(a) हवामानाशी संबंध असलेल्या घडामोडी.
उत्तर : (१) ढग तयार होणे (२) धुके पडणे (३) पाऊस येणे (४) चक्रीवादळ येणें (५) जोराचा वारा
(b) पाणी उपलब्ध असणारी ठिकाणे.
उत्तर : ओढा, ओहोळ, सरोवर, तळे, धबधबा, हिमनग, नदी, समुद्र इत्यादी.
क. कशाला म्हणतात ? (कोणतेही 3 ) - 6
(1) पौर्णिमा : आकाशात पूर्ण चंद्र दिसतो, म्हणजेच चंद्राचा पृथ्वीकडील भाग पूर्ण प्रकाशित दिसतो. त्या रात्रीला पौर्णिमा म्हणतात.
(2) अमावास्या : आकाशात चंद्र
दिसत नाही, म्हणजेच चंद्राचा प्रकाशित भाग पृथ्वीवरून दिसत नाही. त्या रात्रीला अमावास्या म्हणतात.
(3) चांद्रमास : एका अमावास्येपासून पुढच्या अमावास्येपर्यंतच्या 28 ते 30 दिवसांच्या कालावधीला चांद्रमास असे म्हणतात.
(4) तिथी : अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत किंवा पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंतच्या प्रत्येक दिवसाला तिथी म्हणतात.
प्र. 3. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : (कोणतेही 6)
- 12
(1) विषुववृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन भाग कोणते ?
उत्तर : विषुववृत्तामुळे पृथ्वीचे दोन समान भाग निर्माण होतात. त्यांना उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.
(2) 'विषुववृत्त' म्हणजे काय?
उत्तर : पृथ्वीच्या पृष्ठभागावर दक्षिण व उत्तर ध्रुवांच्या मध्यावर असणाऱ्या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त असे म्हणतात.
(3) पाण्याच्या अवस्था कोणत्या?
उत्तर. बर्फ, पाणी आणि बाष्प या पाण्याच्या
अवस्था आहेत.
(4) अन्न कोणकोणत्या पद्धतीने टिकवले जाते ?
उत्तर : वाळवणे, थंड जागी ठेवणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे आणि अन्न-परिरक्षक वापरणे अशा विविध पद्धतींनी अन्न टिकवले जाते.
(5) सप्तरंगी इंद्रधनुष्य वातावरणाच्या कोणत्या आवरणात दिसत असेल ?
उत्तर : वातावरणाच्या तपांबर या आवरणात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसत असेल
(6) वाघाचे अन्न कोणते?
उत्तर: शाकाहारी प्राणी वाघाचे अन्न आहेत.
(7) मोट चालवण्यासाठी शेतकऱ्याना मदत कोण करते?
उत्तर - मोट चालवण्यासाठी शेतकऱ्याना बैल, रेडा असे पाळीव प्राणीमदत करतात.
(8) सिंचनाच्या सुधारित पद्धती कोणत्या ?
उत्तर : ठिबक सिंचन व तुषार सिंचन या सिंचनाच्या सुधारित पद्धती आहेत.